Thursday, 24 December 2020

Can Jinks Break the Batting Jinx? - Boxing Day 26.12.2020 - Second Test Match

 

Can Jinks Break the Batting Jinx?


Question on every Indian cricket lover`s lips is - Can `Jinks` - Ajinkya Rahane - now Team India captain break the jinx of Indian batting after the infamous 36 debacle at Adelaide last week ? What happened in the pink ball test especially on 3rd day afternoon was certainly not rosy at all for the Virat Kohli and boys.

Now that Virat has well and truly back home on recent trend of parental leave (yesteryear cricketers were irresponsible parents or what?), can Ajinkya and more importantly batsmen around him, lift themselves up psychologically to face the fearsome Aussie trio of Pat Cummins, Josh Hazlewood and Mitchell Starc?

With Virat unavailable and Rohit Sharma still in mandatory isolation, in-form KL Rahul looks to be certainty for the second test. For the historic Boxing Day Melbourne Test Match, Saturday 26th December onwards. With team selection news, circling as now fit Ravindra Jadeja instead of test specialist Hanuma Vihari. Shubman Gill in place of Prithvi Shaw. Also Rishabh Pant is likely to replace Wriddhiman Saha, whose batting is not so effective on foreign soil - where as Pant scored century on last tour. Young Mohammed (Siraj) most likely to get chance in the place of senior Mohammed (Shami). Injured Shami in dyeing moments of the last test match is real blow to India. As Ishant Sharma has already missed the tour, courtesy IPL. But the onus is on top order batsmen opener Mayank Agarwal, ever dependable - rock solid Cheteshwar Pujara, experienced stand in Captain Ajinkya Rahane.

Hope India shows far too improved josh in batting, verses Josh Hazlewood, Pat Cummins, Mitchell Starc and not to ignore Nathan Lyon. Hopefully it would be worth getting up early for Indian fans to catch the live action.



Pink Ball test - Not a rosy encounter for India with 36 all down in second innings.

Pat Cummins, Josh Hazlewood and Mitchell Starc broke the Indian batting on 3rd Day itself to offer India humiliating defeat with just 36 all down in second innings. India`s 53 runs lead in first innings did not count much as visitors lost the Adelaide test match by 8 wickets.

Story of the match through score boards : 













3rd T20 - 08.12.2020 - Aussie recover to make it 1- 2 through spinner Swepson and batting of Wade and Maxwell

Mitchell Swpeson breaks the back of Indian batting with 3 wickets at crucial time.

Left arm pacer T Natarajan is the find of the series for India. 


Hardik Pandya bags the Man of the Series award. 



2nd T20 - 06.12.2020 - Hurricane Hardik Pandya seals it with 2 sixes in the last over


                                                 Man of the match Hardik Pandya


 

1st T20 - 04.12.2020 - Concussion Substitute Yuzvendra Chahal steals the show with his 3 wickets



 

Thursday, 3 December 2020

हार्दिक,जाडेजा ,शार्दुल व बुमराह च्या खेळींनी अखेर थोडी स्मितरेषा उमटवली


स्टीव स्मिथ व समस्त कांगारू बंधुंनी अखेर अतिथ्थ्यशीलता दाखविली म्हणावे की काय ? सर्वार्थाने शांत , दाट झाडी व तळ्यांनी युक्त ऑस्ट्रेलिया ची राजधानी कॅनबेरा ला झालेल्या तिसर्‍या व अंतिम सामन्यात ,हा इतका छान फुल फॉर्मातला गडी स्टीव स्मिथ ३०३ धावांचापाठलाग करतांना १ बाद ५६ अशा स्थितीत  शार्दुल ठाकुरच्या लेगला जाणार्‍या निरुपद्रवी चेंडुवर यष्टीरक्षक राहुलकडे झेल देऊन फक्त ७ धावांवर बाद झाला .मुळातच जायबंदी डेविड वॉर्नर, पॅट कमिन्स व मिचेल स्टार्क ही संघात नव्हतेच. आपण दोन तीनदा झेल, सोपी धावबाद करण्याची भरपुर संधी देऊन देखील कर्णधार आरोन फिंच ने बाद व्हायचे प्रयत्न काही सोडले नव्हते व अखेर ७५ धावांवर २६ व्या षटकात १२३/४ वर तंबुत परतला. ह्यावेळेस मात्र २२ धावांवर स्लिप मध्ये केलेल्या मेहेरबानीची पुनरावृत्ती शिखर धवन ने धडपडत कशीतरी दुसऱया प्रयत्नात का होईना टाळली. त्यामुळे शिखरची ऑस्ट्रेलियन अर्धांगींनी फारशी नाराज नको व्हायला बिचार्‍यावर. मग यष्टीरक्षक डावखुर्‍या अलेक्स कॅरी चा प्रतिकार सोडल्यास, ग्लेन मॅक्सवेलचा च मोठा अडथळा होता. ३८ व्या षटकात ३०३ धावांचा पाठलाग करताना दबावाखाली येऊन कॅरी अखेर धावबाद झालाच. २१०/६. मॅड मॅक्स ग्लेन मॅक्सवेल नी नेहमीप्रमाणे स्पिनर जाडेजा व कुलदीप ला स्टेडीयम छतावरून बाहेर भिरकावत सामन्याची सुत्रे पुर्णपणे हातात घेतली, तेव्हा ३-० चा व्हाईट वॉश निश्चित वाटत होता. पण केवळ ३८ चेंडूत ४ षटकारांसह ५९ वर पोहचलेल्या ,नंतर कांगारू विजयासाठी  ३४ चेंडूत ३५ धावा इतके सोपे समीकरण असतानाही अति महत्वाकांक्षे मुळे म्हणा की ज्यादा आत्मविश्वास नडल्यामुळे असेल ,बुमराह च्या भेदक यॉर्कर ला कव्हर वरुन टोलावण्याचा प्रकार नडुन मॅक्सवेल ला त्रिफळाचीत व्हावे लागले. अलीकडे बळींचा दुष्काळ जाणवत असुनही जसप्रीत बुमराहने धिराने शांतपणे केलेल्या उत्कृष्ट गोलंदाजीलाही ह्याचे श्रेय द्यावेच लागेल.

तर हे सगळे असे असुनदेखील मालिका पराभवानंतर ,उशिरा का होईना झगडुन मिळवलेल्या १३ धावांच्या विजयाचे महत्व अजिबात कमी होत नाहीये . ह्या विजयाचे प्रमुख शिल्पकार अर्थातच हार्दिक पंड्या व रविंद्र जाडेजा .तसेच दौर्‍यावर प्रथमच संधी मिळालेले आक्रमक द्रुतगती गोलंदाज शार्दुल ठाकुर,नवोदित पदार्पणवीर नटराजन (सहा सामन्यांनातर भारताला पहिल्या दहा षटकांत बळी मिळवता आला ) , जसप्रीत बुमराह व अर्थातच गोलंदाजांना - मागच्या सामन्यातील अगदीच २-२ षटकांचे हफ्ते देणे अशासारख्या चुका टाळून - व्यवस्थित हाताळणारा कर्णधार विराट कोहली. बाकी विराट कडून कमीतकमी अर्धशतक तर आपण गृहितच  धरलेले असते ना. ह्यावेळेस ६३.  प्रथम फलंदाजी करतांना ५ बाद १५२ वर लागोपाठ चौथ्यांदा हेजलवूड ने विराट ला परत पाठविले तेव्हा सर्वांच्याच मनात ह्यावेळेस पण सगळ संपल्याची अशुभाची पाल चुकचुकली होतीच.पण निव्वळ फलंदाज म्हणुन खेळुन त्या कसोटीवार पुरेपुर उतरलेला हार्दिक पंड्या व गेले दोन एक वर्षांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील आपले फलंदाजी चे नाणे खणखणीत वाजवणारा रविंद्र जाडेजा ( आठवा साक्षात धोनी लाही फिकी पाडणारी त्याची मागील विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतील नेत्रदीपक खेळी ) ह्या जोडीचे इरादे बुलंद होते. ३२ व्या षटकापासून शांतपणे डावाची उभारणी करत ४० व्या षटकनंतर फलंदाजीतील आक्रमणाची धार वाढवत शेवटच्या ५ षटकांत तर ह्या जोडीने अक्षरश: धुमाकुळ घातला व मुक्तपणे चौफेर चौकार,षटकारांची बरसात करत ७६  धावा लुटल्या. केवळ १०८ चेंडूत एकुण १५० धावांची अभेदय भागीदारी करून ३०२ पर्यन्त मजल मारली व त्यायोगे  संपुर्ण भारतीय संघात विजयासाठी लढण्याची ईर्ष्या निर्माण केली. अशा प्रकारे अखेर मालिका निकाल ०-३ न होऊ देता १-२ असा केला. अर्थातच त्यामुळे  एकदिवशीय सामन्यांच्या लागोपाठ पाच पराभवांमुळे अगदीच गमवलेली भारतीय संघाची  थोडीफार प्रतिष्ठा परत मिळवत उर्वरित दौर्‍यासाठी  मनोबळ उंचवलेलेच राहील हे बघितले. उर्वरित तीन टीट्वेंटी व चार कसोटी सामन्यांसाठी भारतीय क्रिकेट रसिकांच्या अपेक्षा वाढविल्या हे मात्र नक्की.

 

 

Tuesday, 1 December 2020

प्रिय स्टीव स्मिथ व समस्त कांगारू बंधुंनो,

 ह्या स्टीव स्मिथ ला तेच तेच काम पुन्हा पुन्हा करायचा कंटाळा कसा तो येत नाही ? किती एकसूरीपणा असावा ना एखाद्याच्या व्यक्तिमत्वात. तेच मैदान, तेच प्रतिस्पर्धी, फिंच व वॉर्नर च्या सौजन्याने मिळालेली डावाची शतकी पायाभरणी ही साधारण तशीच. अगदी तसेच ते पुर्ण क्रीज मध्ये नाचत बागडत, कधीही विशेष प्रेक्षणीय नसलेले ,पण नेहमीप्रमाणे संघासाठी अतिशय उपयुक्त असे ते बरोब्बर ६२ चेंडूतच फटकावलेले तसेच आक्रमक शतक. डियर स्मिथ असा तोच तोच पण फक्त कसोटी सामन्यांमध्येच शोभतो ना .आणि भारतीयांना इतके दुखावून ,सारखे सारखे असे घायाळ करून कसे चालेल रे, परवडेल का तुला ते.भाऊ परत आय पी एल खेळायचे की नाही?तुला माहीत होते ना की सध्या आमच्या मुंबईकर अंबानींचा जायबंदी रोहित शर्मा व भुवनेश्वर कुमार आधीच संघात नाहीयेत.व आम्हाला २० एक षटकांचे जास्तीतजास्त दीड एक तासच क्षेत्ररक्षण, सगळीकडून छान छान खुप लाड होणार्‍या वातावरणात खेळायचीच सवय व आवड आहे.तरी सुद्धा इतका निष्ठुरपणा? मान्य आहे की मागच्या डिसेंबर २०१८ च्या दौर्‍याच्या वेळेस वॉर्नर ची चेंडू कुरतडण्याची कल्पना व त्यायोगे भोगत असलेल्या आय सी सी च्या शिक्षेमुळे तुम्हा दोघांनाही संघाबाहेर राहावे लागले होते.पण प्रिय स्टीव स्मिथ ,आम्ही तुला इतक्या मानानी  व भरपूर ``धना``नी अगदी कर्णधार पद वगैरे देऊन कुठेही आयपीएल जत्रा भरली तरी बोलवतो ना रे. ह्या सगळ्याची थोडीफार तरी जाणीव ठेवायची नारे. कित्ती कित्ती कृतघ्नपणा हा. काय तर म्हणे आम्ही पुर्णपणे व्यायसायिक खेळाडू, मग आम्ही नाही का? आम्ही किती छान लॉकडाऊन वगैरे वेगवेगळ्या तर्‍हेने फूल टु एंजॉय करून मस्तपैकी फक्त दुबई ,शारजा वारी करून तुमच्या पाहुणचाराला आलो तर हे काय चालवले आहेस तु भलतेच. ( बघ आमचा विराट जानेवारीत परत शेवटच्या तीन  एक कसोटी सामन्यांवर पाणी सोडुन – पालकत्वाची रजा – असे भारदस्त नाव देऊन आमच्या नाजुक अनुष्का बरोबर असणार आहे ; जसे काही गावस्कर वगैर पुर्वीचे बाप व पालक म्हणुन अगदीच बेफिकीर होते ना. तरी बरं जगभर धुमाकूळ घालण्यार्‍या तेज तर्रार गोलंदाजाचा सामना त्यांनी कायम विनाहेलमेट च केल्यामुळे अजुनही जगभर त्यांना सगळेच  ``बाप माणुस`` म्हणतात. असो काळाचा महिमा, दुसरे काय , तर तो मुद्दा वेगळा, ते राहुदे ).

आता बुधवारच्या सामन्यात वॉर्नर नसणार – क्षेत्ररक्षण करताना जायबंदी वगैरे झाल्यामुळे. इथेही मला हे अजून समजत नाहीये की इतकी छान ८३ धावांची धुवांधार खेळी करून परत एकदा जवळपास दीडशे धावांची मजबुत पायभरणी करुन ३८९ धावांचा डोंगर उभा केल्यावर देखील, कोणी इतक मनापासून, जीव काढून , दुखापतीची पर्वा न करता क्षेत्ररक्षण करत असतं का . दोन चार धावा  इकडे तिकडे झाल्या तर असा काय विशेष फरक पडणार होता निकालात ? निदान प्रत्येक आयपीएल मध्ये तुला डोक्यावर घेणार्‍या कट्टर चाहत्यांचा तरी थोडाफार विचार करायचास ना रे. आमचे बघ ना इतके जगातले सर्वोत्कृष्ट ,सर्वात फीट तंदुरुस्त क्षेत्ररक्षक सुद्धा दोन पायांच्या बोगद्यातुन इतक्या धावा  सोडतात, तरीही रविदादा , ते स्वत: ,आम्ही कोणीच विशेष मनावर घेत नाही.असो तर आरोन फिंच व समस्त कांगारू बंधुनो, कृपया आम्हा सगळ्या कोट्यवधी भारतीयांना, जाहिरातदारांना, जागतिक दर्जाच्या ब्रांडेड खेळाडूंना ह्या अभुतपूर्व करोना महामारी त्रस्त वातावरणात तरी थोडाफार दिलासा मिळेल असे पहाना प्लीज . तेव्हढ ह्या तिसर्‍या व अखेरच्या सामन्यात तरी. आम्हाला परत नव्या जोमानी पिटायला अजुन टी ट्वेन्टी व झालेच तर नंतरही चार कसोटी सामने आहेतच ना. आमच्यातला वाघ जागवलात तर बघा हं, केव्हाना केव्हा यालाच ना परत आमच्या परसात , गल्लीत खेळायला.

असो तर मग समस्त आत्मनिर्भर ,आतिथ्यशील, भावनाप्रधान , टी व्ही वेड्या घरबैठया चाहत्यांच्या भावना तुमच्यापर्यंत पोहचल्या असतीलच. अपेक्षा पुर्तीच्या प्रतीक्षेत आहोत. भेटु या परत बुधवार , २ डिसेंबर ला तुमच्या राजधानीत कॅनबेरा ला, तिकडे सगळं शांत आहे ना...



                                                
                                                            सामनावीर स्टिव स्मिथ 


कर्णधार आरोन फिंच